सोमवार, ४ फेब्रुवारी, २०१९

पुरस्कार

खरपूस • वात्रटिका

    « पुरस्कार »
पुरस्कार आता खरं तर
'पुरस्कारा'सारखा राहिला नाही
कुणी म्हणतं योग्याला तो
मिळाल्याचा आम्ही पाहिला नाही

महान नेत्या-महात्म्यांचं कार्य
जगापासून लपून राहिलं नाही
अमूल्य ते कर्तृत्व अजून 
कुणी मापून पाहिलं नाही

कुणी त्यामुळेच लोकांच्या मनात
भारत'रत्न' ठरलं आहे
आजकालच्या पूरस्कारात फक्त
राजकारणच उरलं आहे
• रघुनाथ सोनटक्के

(४ फेब्रुवारी २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १०)
Vatratika

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks to comment on my blog. :)