शनिवार, ४ मे, २०१९

नक्षली हल्ला

खरपूस • वात्रटिका
« नक्षली हल्ला »
विचाराची साथ सोडून
नक्षल्यांचा लढा आहे
एकसंघ भारताच्या शांतीला
थोडा-थोडा तडा आहे

प्रवाह, लोकशाही सोडून
न्याय मिळणार नाही
हिंसाचाराच्या रक्ताने
विकास फळणार नाही

माणसांचा जीव घेणारी
बंदकीची गोळी असते
फलित मात्र काही नाही
दुःख, गरिबीची झोळी असते

• रघुनाथ सोनटक्के
(४ मे २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १७९)
Vatratika
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks to comment on my blog. :)