सोमवार, ३० नोव्हेंबर, २०२०

शेतकर्‍यांची दिल्ली

शेतकर्‍यांची दिल्ली
भक्तांकडून उडवली जातेय
शेतकरी आंदोलनाची खिल्ली
मागण्यासांठी गाठायचीय
काही करून दिल्ली
करा पोलीस बंदोबस्त
कितीही पाण्याचा मारा
करून मुस्कटदाबी अशी
नाही सत्तेचा अहंकार बरा
हित कशात आहे आपलं
कळतं शेतकर्‍यांना चांगलं
अहंकारी सरकार शेवटी
काळ्याचंही आहे नमलं
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
  मो. ८८०५७९१९०५
Vatratika, Raghunath Sontakke


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks to comment on my blog. :)