बुधवार, ३१ मे, २०१७

शेतकर्‍याचा संप

« खरपुस वात्रटिका »

            शेतकर्‍याचा संप

          इतिहासात पहिल्यांदाच होतोय
शेतकर्‍याचा संप
सरकार, सामान्यांना आता
भरेल धरणीकंप

कुणीच एेकत नाही त्याचं
करा सातबारा कोरा
मालाला ना भाव, ना हमी
कधी होईल हा रोग बरा

मिळु दे धडा सरकारला
कळु दे जनतेला त्याच्या व्यथा
त्याच्याविणा जगणं कसं कठिण
लागेल आता सार्‍यांनाच पता
       • रघुनाथ सोनटक्के
भेट द्या : https://vatratika.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks to comment on my blog. :)